Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets:...

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

एशिया चषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या षटकात १४८ धावांचे लक्ष्य गाठले.

भारतीय संघाच्या विजयात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जडेजाने ३५ आणि हार्दिकने पांड्याने नाबाद ३३ धावा केल्या.

भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. १४८ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १९.४ षटकात पूर्ण केले. हार्दिक पंड्याने नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा ऑल राऊण्डर खेळाडू हार्दिक पांड्या ३५ धावांवर नाबाद राहिला. तर कोहली आणि जडेजाने ३३-३३ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला.
भुवनेश्वर कुमार ने सर्वाधिक चार आणि हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!